Share

“बाबरी पाडताना दुर्बिणीनं शोधूनही तिथे शिवसैनिक दिसला नाही”, रावसाहेब दानवेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यात सध्या बाबरी कोणी पाडली याच्या श्रेयवादावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने बाबरी पाडताना फक्त शिवसेना पुढे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पडताना तेथे एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचे म्हटले आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया शिवसेनेला टोला लगावला आहे.

“बाबरी पाडताना मी स्वतः त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होतो. दुर्बिणीने शोधून सुद्धा कुणी शिवसैनिक आम्हाला तिथे दिसला नाही. एखादा शिवसैनिक होता, तर त्याचा पुरावा त्यांनी दाखवावा. मी, गोपीनाथराव मुंडे आणि त्या काळातील अनेक भाजप नेते त्याठिकाणी होते. आता आम्ही केलेले श्रेय जर ते लाटत असतील, देशाची जनता त्यांना माफ करणार नाही.”, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान फडणवीस यांच्या दाव्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. १८५७ च्या लढ्यातही फडणवीस यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत  कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाबरी वरून भाजप-सेना आमने-सामने आली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!