Share

इतकी असहायता का?; ‘त्या’ हल्ल्याप्रकरणी मोहित कंबोज यांचा आयुक्त संजय पांडे यांना सवाल

Published On: 

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी २२ एप्रिल हल्ला केला होता. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाला होता.  ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याप्रकरणी अजून कोणताही पाठपुरावा करण्यात न आल्याने मोहित कंबोज यांनी आयुक्त संजय पांडे ( Sanjay Pandey) यांना सवाल केला आहे.

“२२ एप्रिलला माझ्यावर हल्ला झाला, २४ एप्रिलला  सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही, अद्याप अटक नाही. सीपी संजय पांडे यांना माझा प्रश्न आहे की, समाजात तुमची कोणती छाप निर्माण होत आहे?, हे लोकशाहीसाठी चांगले आहे का?, इतकी असहायता का?”, असे सवाल मोहित कंबोज यांनी ट्वीट करत केले आहे.

दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र भाजपकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली. आता मोहित कंबोज यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आणला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!