Share

मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवार करतात, उद्धव ठाकरे सध्या रिकामेच; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर अभियानामध्ये केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांंनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यामुळे सहाजीकच त्यांना मी मुख्यमंत्री असल्याची भावना वाटणे गैर नसल्याचे सांगत, सध्याच्या मुख्यमंत्र्याकडे कोणतेच काम नाही, त्यांचे काम हे शरद पवार असल्याची टीका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण अद्यापही दिलेले नाही, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. परंतु आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टिकाही यावेळी कपील पाटलांनी केली आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्याला अधिकार दिले असतांनाही आरक्षण देण्याऐवजी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. या महाविकास आघाडी सरकाराने सत्तेत आल्यापासून नुसता गोंधळ घातला आहे, असं कपील पाटलांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!