चिपळूण : ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री मला बाजूला करत आहेत’, अशी भावना शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली.
ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते. ‘बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक’ अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून खास करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कदम हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या सहा पानी पत्रात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या गोटातून मंत्री झालेलेच आपल्याला संपवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत याची माहिती दिली आहे. काही मंत्र्यांच्या नावांचा देखील पत्रात उल्लेख आहे. निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात असल्यामुळे मी नाराज आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावाही रामदास कदम यांनी पत्रात केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
