Share

खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच खासदार रजनीताई पाटील यांनी दिल्ली येथे सोनिया गांधींची भेट घेतली. त्यांनी या वेळी सोनिया गांधींचे आभार मानून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिहारी नागरिकांचा मृत्यू झाल्याने जम्मू-काश्मीरमधील सद्य:स्थितीची माहिती तिथल्या प्रभारी या नात्याने दिली. तसेच मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे झालेले नुकसान याचीही खासदार पाटील यांनी माहिती दिली. अनेक विषयांवर त्यांनी या वेळी चर्चा केली. खासदारपदाची जबाबदारी दिल्याने त्यांनी आभार व्यक्त केले.

बीड काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या २१ तारखेला मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजकिशोर मोदी हे मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

एकीकडे रजनी पाटील यांना राज्यसभेवर खासदार करून बीड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असतानाच राजकिशोर मोदी यांनी मात्र काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. राजकिशोर मोदी यांच्या ताब्यात मागच्या तीस वर्षापासून अंबाजोगाई नगरपालिका आहे. आता मोदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद मोदींमळे नक्कीच वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!