🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतका आहे. त्यामुळे योग्य पावले न उचलल्यास भारतात मंदी येण्याची शक्यता आहे.
याविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे त्यांनी ‘सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं असं विधान पवार यांनी केले आहे.
पुढे बोलताना पवार यांनी ‘काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात. शेतमालाचे दर वाढले की परदेशातून माल आयात केला जातो, ही बाब शेतकऱ्यांसाठी घातक आहे असंही पवार म्हणाले.
दरम्यान, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंह यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीकडे चालला आहे असं विधान केले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली होती.
- शेतकऱ्याच्या मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकेल
- ‘भाजपमध्ये मेगाभरती नाही, ठराविक नेत्यांनाचं प्रवेश दिला जातोय’
- कॉंग्रेसमध्ये आश्वासनं पाळली जात नाहीत : पवार
- त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
