मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देत मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका केली. तसेच हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात एका चर्चेत बोलत असतांना शालिनी ठाकरे म्हणाल्या की,‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून बेकायदेशीर भोंग्यांवर जी कारवाई केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हेच काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का जमत नाही? की त्यांना हे करायचेच नाही?’ हा सवाल शालिनी यांनी उपस्थित केला.
#TimesNow आणि #RepublicTV च्या चर्चेत भाग घेऊन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याबाबतची सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच हा कोणताही धार्मिक विषय नसून केवळ सामाजिक विषय आहे असं मत मांडले. pic.twitter.com/SqDQlgGn2P
— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 29, 2022
दरम्यान, यावेळी शालिनी ठाकरे यांनी राज ठाकरे यांची मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याबाबतची सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच हा कोणताही धार्मिक विषय नसून केवळ सामाजिक विषय आहे, असे मतही त्यांनी मांडले.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा
- महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
- “…हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला चित्रा वाघ यांचा टोला
- मोठी बातमी! देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने घातली बंदी
- मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय


