जालना : जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आरक्षणाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे आंदोलकांनी माजी केंद्रिय मंत्री तथा खा. शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेण्याचे ठरविले होते. मात्र ही आरक्षण आक्रोश विनंती रॅली निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर संतप्त गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यातील एका महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना अंबड याठिकाणी भरती करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होते. मराठा तरुणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत.
मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढण्यात येणार होती. मात्र, बारामतीला प्रस्थान करण्यापूर्वीच आज सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदोलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर बळजबरीने ताब्यात घेण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपासून १४ जणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यातील एक उपोषणकर्त्या महिला कौशल्याबाई जाधव वय (६४) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाचा जीव भांड्यात पडला! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नव्हे
- अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
