नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध म्हणजे अत्याचार नव्हे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल सात वर्षांनंतर २५ वर्षीय युवतीने आरोपीविरुद्ध दाखल केला होता. यावर निर्णय देताना न्या. झेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांनी तो गुन्हा रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, पवन गणेश चौरागडे (३०, रा. आकोटखेड, जि. अकोला), असे गुन्हा रद्द झालेल्या युवकाचे नाव आहे. २०१२ मध्ये आरोपी आणि युवती एका लग्नसमारंभात भेटले. त्यांची ओळख होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला, असा आरोप करून तिने प्रथम अमरावती येथील परतवाडा पोलीस ठाण्यात जानेवारी २०१९मध्ये तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, (एन) २, ४१७, सेक्शन ३, ४ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा रद्द करण्याकरिता आरोपीने हायकोर्टात अर्ज केला. बचाव पक्षाने सांगितले की, आरोपीने युवतीला कोणतेही लग्नाचे आमिष दिले नाही. युवती २५ ते २६ वयोगटातील आहे. आरोपी व युवतीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत. त्यामुळे यास लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला, असे म्हणता येणार नाही. तसेच तक्रार ही सात वर्षांनंतर देण्यात आली होती. हायकोर्टाने बचाव पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीविरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तामिळनाडूप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी केंद्राने हायकोर्टात शपथपत्र द्यावे’
- ह्रदयद्रावक घटना! आईची मुलासह आत्महत्या, प्राण गेल्यानंतरही चिमुकल्यावर घट्ट पकड
- धक्कादायक! बसमध्ये ८१ प्रवासी; जिंतूर येथील एस.टी. आगारात कोरोना नियम धाब्यावर
- यांच्यावर कारवाई होणार का? कोरोना तपासणी करणारे कर्मचारीच मास्कविना
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, मध्यप्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
