Share

विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता येत नसल्याने…”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास विरोधक तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, परंतु ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावे हे चुकीचे आहे’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ज्या पद्दतीने वागत आहे त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सुचना घ्यायला हव्यात’, असा खोचक टोलाही राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!