🕒 1 min read
दिल्ली : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “2019 मध्ये मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो. ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली”. असा दावा दानवे यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. आपण जर हॉटेल ब्लू सी वरळीच्या पत्रकार परिषदेतील अमित शाहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन ऐकले असेल तर, रावसाहेब दानवे हे कुठेतरी पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर परत यावे, एवढेच मला सांगावे लागेल.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
- IND vs WI : वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला करावा लागणार ‘या’ संकटांचा सामना; वाचा सविस्तर…!
- Shinde Vs Thackeray : “…तर हायकोर्टात का गेला नाहीत”, सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
