Share

“राम मंदिराच्या लढ्यात सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या”, भाजपच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त काल (२३ जानेवारी) उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा जोरदार समाचार घेतला. ‘राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या, तुम्ही त्यावेळी तोंडाच्या वाफा दडवत होता.’ अशी टीका फडणवीस यांनी केली होती. आता या टीकेलाच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे .असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच राम मंदिराच्या लढ्यात फक्त शिवसैनिक पुढे होता. त्यावेळी सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या. “मुंबईत ज्यावेळी दंगल झाली होती त्यावेळी शिवसेनेने मुंबईला वाचवलं होतं, शेकडो शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्यावेळी भाजप कुठे होतं?” असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राम मंदिराचे श्रेय हे मोदींचं नसून सर्वोच्च न्यायालयाचं असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!