🕒 1 min read
मुंबई: आज होळीचा सण आहे तर काही दिवसात रंगपंचमी देखील आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकार विरोधात तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. कितीही निर्बंध घातले तरी आम्ही होळी आणि रंगपंचमी जल्लोषात साजरी करू असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान भाजपच्या अन्य काही नेत्यांकडूनही या निर्बंधांना विरोध केला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना फैलावर घेतले आहे.
फक्त हिंदूंच्याच सणांना राज्य सरकार निर्बंध घालते असा आरोप देखील भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले कि, लोकांचे प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याच्या मानसिकतेतुन विरोधी पक्ष बाहेर पडायला तयार नाही. राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठीतरी विरोधी पक्षाने निर्बंधांना विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
