मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसा पठन करण्यामुळे तुरुंगात टाकले जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असते. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना चिंता करण्याची गरज नाही. हनुमान चालीसाच्या नावाने देशात दंगे घडवण्याचा ज्यांचा डाव आहे. त्यांच्याशी शिवसेना लढतेय. यामुळे बाळासाहेब ठाकरे आमच्यावर फुले उधळत असतील.”, आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.
तसेच पुढे ते म्हणाले की, “अश्विनीकुमार चौबे ज्या प्रांतातून येतात त्या प्रांतातील मुख्यमंत्री सन्मानीय योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उदगार काय आहेत, हे बघावे. हनुमान एक दलित व्यक्ती आहे. हनुमान भगवान नही है. हनुमान एक जंगली वानर हे….असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसा विषयी बोलत असतील तर अश्विनी कुमार चौबे यांनी पुन्हा एकदा ‘योगी चालीसा’ वाचायला पाहिजे.”, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.
महाराष्ट्र हा राम आणि हनुमानची पूजण करणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही जी बेमानी केली त्याबाबत कदाचित बाळासाहेब यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील. असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेना समोरून वार करणारा पक्ष, पाठीमागचे वार…”, संजय राऊत यांचा विरोधकांना टोला
- “योगींच्या भगव्या वस्त्राचा अपमान…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- “आम्ही अंगावर केसेस घेण्यास तयार”; अमित ठाकरेंचं पोलिसांना आव्हान
- “…यावर बाळासाहेब ठाकरे आमच्यावर फुले उधळत असतील”, संजय राऊतांचा विरोधकांना टोला
- “विरोध ‘मजहब’ला नाही, तर…”, मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य


