🕒 1 min read
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. असे असतांनाच १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आमचा विरोध ‘मजहब’ला नाही, तर ‘गहजब’ला आहे, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे.
यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘हा धार्मिक नाही,तर सामाजिक मुद्दा आहे. तसेच यामध्ये नवीन काहीच नाही,जुनाच कायदा आहे. आमचा विरोध ‘मजहब’ला नाही, तर ‘गहजब’ला आहे’, असे पाटील म्हणाले आहेत. तसेच यासह त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत नागरिकांना राज ठाकरेंच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
धार्मिक नाही,सामाजिक मुद्दा आहे.
नवीन काहीच नाही,जुनाच कायदा आहे.
विरोध ‘मजहब’ला नाही…’गहजब’ला आहे.#MNS #महाराष्ट्रदिन #राजसभा pic.twitter.com/2jkUR2rHlD— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 29, 2022
दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे ते यावेळी आणखी काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…पण ते राज्याची १००% वाट लावत चाललेत”, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- “…तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते”, नितेश राणेंचा टोला
- “उद्धव ठाकरे कुदळ-फावड घेऊन मशिदीवर…”, राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘मनसे’ नेत्याला कल्याण पोलिसांची नोटीस; संदीप देशपांडेंनी म्हटले, “‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला…”
- “यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामूळेच…”, अविनाश जाधवांची मविआ सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
