मुंबई: गोवा येथील विधानसभा निवडणूक (Goa Elections) तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेना १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते सकाळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप सोबतच तृणमूल आणि आप पक्षावर देखील टीका केली आहे.
संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले, गोव्यात फक्त १०-१२ लोक राजकारण करतात. तेच भूमाफिया आहेत. सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले लोक देखील ड्रग्स माफिया आहे. गोव्यातील (Goa) राजकारण प्रस्थापितांच्या हातात गेलंय. भ्रष्टाचारी, ड्रग्स माफियांच्या हातात गोव्याचं सुत्र आहे. ते मोडीत काढायचं असेल आणि गोव्याचे ‘कॅरेक्टर’ सुधरवायचे असेल तर गोवेकरांनी सामान्य माणसाला निवडून आणायला पाहिजे. गोव्यात हे होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
तृणमूल कॉंग्रेसवर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना गोव्यात १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार आहे. पण, गोव्यात तृणमूल काँग्रेसची (TMC) वावर पाहता ते मनाने सत्तेवर आलेले आहेत. आता फक्त शपथ घ्यायची बाकी आहे, असा खोचक टोला त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लगावला. तर दिल्लीत कोरोना वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात लोकांच्या दरवाज्यावर जाऊन प्रचार करत आहेत, असा टोला अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘गोवाचं ‘कॅरेक्टर’ सुधरवायचं असेल तर…’; संजय राऊतांचे वक्तव्यं
मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, ‘हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे’
‘अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही’, गुळूंब ग्रामपंचायतीचे ‘स्टार प्रवाह’ला पत्र
‘शरद पवारांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावे’; अजित पवार यांचा फडणवीसांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

