टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर व सांगलीमध्ये महापुराने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये महापौर संगीता खोत यांच्यावर पूरग्रस्त सांगलीकर संतापले आहेत. पूरग्रस्तांना अद्याप कोणतीच मदत मिळत नसल्याने हे सर्व पूरग्रस्त चांगलेच संतप्त झाले आहेत. महापौरांना घेराव घालण्यात आला.
तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाच वातावरण निर्माण झाले आहे. पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळत नसल्याने पूरग्रस्तांनी रस्तारोको आंदोलन केले.
दरम्यान, राज्य सरकारकडून जवळपास ६८०० कोटींच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तर अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष पूरग्रस्तांना मदतीला धावून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा : भुजबळ
‘तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा’, गडकरींचा राणेंना चिमटा
‘प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे विचार संपवत आहेत’
तिहेरी तलाक झालं, कलम 370 झालं , मोदींचे लक्ष्य आता ‘सामन नागरी कायदा’ : शिवसेना
कॉंग्रेसमध्ये आश्वासनं पाळली जात नाहीत : पवार


