बीड : कपडे धुण्यासाठी गोदावरीच्या पात्रात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे नेहा धर्मराज कोरडे (वय ९) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८) अशी मृत मुलींची नावे आहेत.
नेहा व अमृता या बहिणी शनिवारी नेहमीप्रमाणे गोदापात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पाय घसरून त्या पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. गोदापात्रातील वाळूच्या मोठ्या खड्ड्याने या बहिणींचा जीव घेतल्याचा आरोप केला जात आहे. चकलांबा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
‘वाळू माफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात फक्त तीन ठिकाणी वाळूचा ठेका देण्यात आलेला आहे. इतर ठिकाणी अनाधिकृतपणे वाळूचा उपसा होत आहे. वाळू कोण उपसतयं याच्या मागील मास्टरमाईंड कोण आहे याची सगळी माहिती हद्दीतील महसुल आणि पोलीस प्रशासनाला असते. मात्र, केवळ लाचखोरीमुळे वाळू माफीयांवर कारवाई होत नाही. राक्षसभुवन हद्दीत दोन मुलींचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यु झाला. ज्या खड्डयामध्ये ज्या मुलींचा मृत्यू झाला ते खड्डे वाळू माफीयांनी खोदून ठेवले होते. याप्रकरणी महसूल प्रशासनासह वाळू माफीयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांना अज्ञाणी म्हणत राणेंचा जाहीर इशारा, ‘अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही!’
- ‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?..,’ संजय राऊतांनी राणेपुत्रांना शब्दांनी झोडपले
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- ‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

