🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’च्या सिक्वेल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सैफ एका कार्यक्रमात असं काही बोलला की सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून सर्वांना धक्काच बसला.
नुकतीच या संपूर्ण टीमनं लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. ज्याचा प्रोमो प्रदर्शित झाला असून यातील सैफ अली खानच्या एका वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शोमध्ये कपिल शर्माच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सैफनं ‘मी जास्त काळ घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल’ असं वक्तव्य केलं आहे. या शोमध्ये हजेरी लावलेल्या सैफला सतत कामात व्यस्त राहण्याचं कारण विचारलं. ‘तुला आधीपासूनच असं कामात व्यस्त राहायला आवडतं की तू तुझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब वाढल्यामुळे जास्त काम करत आहेस?’ असा मजेदार प्रश्न यावेळी कपिल शर्मानं विचारला.
‘मी स्वतःला यासाठी कामात व्यस्त ठेवतोय कारण मला भीती वाटते की मी घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल.’ सैफचं हे मजेदार उत्तर ऐकताच सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.‘बंटी और बबली २’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सैफ आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
