कोल्हापूर: आज उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वचं मुद्यांवरून केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कोल्हापूरातील भगवा पुसू देणार नाही असे विरोधकांना थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
म्हणाले, “कोल्हापूर हा भगव्याची बालेकिल्ला आहे. नानांच्या प्रचाराला फडणवीस आले यावरून समजून जा. बोलायला काही मुद्दे नसले की भ्रम निर्माण करायचा, ही त्यांची सवय आहे. असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. पुढे म्हणाले, रामाचा जन्म झाला नसता तर यांच राजकारण कस चाललं असतं? ते रेटून खोट बोलत आहेत, ते सत्य आहे असं वाटत आहे. आपण कशातच कमी पडत नाही आम्ही खोट बोलण्यात कमी पडतो. असा टोलाही लगावला.
“तसेच कोल्हापुरात सरकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यापुढे ही यशस्वी करायचा आहे. निवडून आल्यावर गुण्या गोविंदाने कामं करा. रात्र वैऱ्याची आहे पण काळजी करू नका. कोल्हापूर मधून भगवा पुसेल असं कोणीही कितीही म्हणालं तरी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मी हे होऊ देणार नाही”. असा विश्वास देत विरोधकांना थेट आव्हानच दिले.
महत्वाच्या बातम्या –
“कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा?”; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला सवाल
IPL 2022 RR vs LSG : लखनऊनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
“भाजप नेत्यांच्या इफ्तार टोप्या आम्ही पहिल्या आहेत.” ; अरविंद सावंत
“युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द का मोडला?”; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल
IPL 2022 KKR vs DC : आपली बॅटिंग भारी आणि फिल्डींग लय भारी..! लॉर्ड ठाकूरनं घेतला रहाणेचा सुपरकॅच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

