Share

तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षांनंतर मास्क काढला. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा होता काय? असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

शरद पवारांना शेतकऱ्यांचे जाणते राजे मी मुळीच म्हणणार नाही. ते तर शेतकऱ्यांचे प्रपंच मातीत घालणारे लुटारू राजे आहेत. राज्याचे सर्वांत अधिक नुकसान बारामतीकरांनी केलं आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडला तर ती तंबाखू आणि  एखाद्या शेतकऱ्याने खसखस पिकवली तर गांजा पिकवला म्हणून तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय? असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात असा दावा करत उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही. पालकमंत्र्यांनी‌ कंस मामाची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही सदाभाऊ यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!