मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, याला अनुसरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी कोरोनाची तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील, अशी टीका केली आहे.
नवाब मलिकांच्या या टीकेवर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार असेल असे नवाब मलिक म्हणतात. म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची, नाव मात्र शेजाऱ्याचे लावायचे’, असे म्हणत खोत यांनी मलिकांना खोचक टोला लगावला आहे.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार: नवाब मीया
म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची, नाव मात्र शेजाऱ्याचे लावायचे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 2, 2022
दरम्यान, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. प्रधानमंत्री लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत, पण तरीही भाजपचे लोक त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येने लोक जमवित आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुकी दरम्यान दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील, हे स्पष्ट आहे, असे नवाब मलिक म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- …त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत
- ‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’
- ‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’
- ‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल


