नवी दिल्ली : भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली (Virat Kohli) ला हटवल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार बनवल्यानंतर सबा करीम (Saba Karim) ची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे. आयसीसी स्पर्धा न जिंकल्यामुळे कोहलीने कर्णधारपद गमावले असावे, असे मत सबा करीमचे आहे.
सबा करीमने यांनी त्यांच्या ‘खेलनीती’ या यूट्यूब चॅनलवर याबाबत चर्चा केली आहे. यावेळी ते म्हणाले, कोहलीची हकालपट्टी करण्यात आली हे म्हणणे खरे आहे. T20 कर्णधारपदाचा त्याग करताना त्याने एकदिवसीय कर्णधार म्हणूनही राहायचे नाही असे घोषित करायला हवे होते. याचा अर्थ त्याला एकदिवसीय कर्णधारपदी राहायचे होते. पण आयसीसी ट्रॉफी न जिंकल्यामुळे विराटने एकदिवसीय कर्णधारपद गमावले असावे.
कर्णधार बदलण्याबाबत कोहली, राहुल द्रविड किंवा बीसीसीआयशी कोणीतरी बोलले असावे, असे मला वाटते. राहुल द्रविड हा खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी ओळखला जातो. एवढा मोठा निर्णय घेताना मला वाटतं, कोहलीबद्दल बोललं गेलं असेल.
विशेष म्हणजे कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने संयुक्तपणे घेतला आहे. याबाबत मी आणि निवड समितीचे प्रमुख त्यांच्याशीही बोललो. निवड समितीला दोन पांढऱ्या चेंडूंचे कर्णधार असणे योग्य वाटले नाही, त्यामुळे रोहित शर्माकडे दोन्ही जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कोहलीला शेवटच्या 20 कर्णधारपदावरून पायउतार न होण्याची विनंती करण्यात आली होती पण तो मान्य झाला नाही. रोहित शर्मा पूर्ण कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेत भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. टीम इंडिया तिथे कसोटी मालिकाही खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा


