🕒 1 min read
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धवाद सुरु आहे. ज्याचे पडसाद जगभर उमटत आहे. पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine)आणि रशिया (Russia)यांच्यातला तणाव काही नवीन नाही. मात्र आता हा तणाव इतका वाढला आहे की, युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.
“रशिया-युक्रेन सीमेवर युद्धाच्या परिस्थितीत, मी एअर इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, फ्लाइट फ्रिक्वेन्सी वाढवावी. आणि युक्रेनमध्ये राहिलेल्या भारतीयांना परत देशात आणावे. दोन्ही देशांमधील तणाव लवकरच संपेल अशी आशा आहे.”, असे ट्वीट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
Amidst the war situation at the Russo-Ukraine border, I request @airindiain & @PMOIndia to increase flight frequency & bring Indians who stay in Ukraine back to the country. Hope the tension between the two nations ends soon. @drsjaishankar@JM_Scindia@IndiainUkraine
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 22, 2022
दरम्यान युक्रेनमध्ये सध्या २० हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश मेडिकलचे म्हणजेच वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. तर आयटी, फार्मा आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या सुरक्षिततेची सगळ्यांत जास्त चिंता भारताला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Russia-Ukraine Crisis:रशियाने युक्रेनमध्ये सैन्य हलवले; जाणून घ्या सविस्तर
- ‘राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेत’ – राजू शेट्टी
- रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला! म्हणाले, “मत खाण्याच्या…”
- अरेरे! पीएसएलचे अजब रंग; कॅच सोडली म्हणून बॉलरने फिल्डरच्या कानाखाली लगावली
- ‘शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी आपल्या…’; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
