मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर ठाकरे-कोश्यारी वादात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला ट्वीट करून लगावला आहे.
वाह प्रशासन – bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! ???????? #Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
अमृता फडणवीस यांच्या याच ट्वीटला रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरुन देखील अमृता फडणवीस यांना टोमणा लगावला आहे.रुपाली चाकणकर म्हणाल्या,’राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.(1/2)@fadnavis_amruta
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 14, 2020
दरम्यान, शिवसेना महिला आघाडीने देखील अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ‘नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकारणाशी संबंध आलेल्या अमृता फडणवीसांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेची ही चौथी पिढी आहे जी हिंदुत्वावादी आहे. आमदार, खासदार, नगरसेवक वा प्रवक्त्या असत्या तर आम्ही ऐकून घेतलं असतं. आमचं तोंड त्यांनी उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. मात्र आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. जर बोलायचंच असेल तर आमच्या समोर येऊन बोलावं,’ असं खुलं आव्हान शिवसेना महिला आघाडी तर्फे नेत्या विशाखा राऊत यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- भारत आणि चीन सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

