Share

भारत आणि चीन सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर अधिकाऱ्यांदरम्यान 12 ऑक्टोबर रोजी चुशूल येथे,बैठकीची सातवी फेरी झाली. यावेळी,भारत-चीन सीमाभागाच्या पश्चिम क्षेत्रात,प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या तणावावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रामाणिक,सखोल आणि विधायक चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक,विधायक स्वरुपाची होती आणि यावेळी,दोन्ही बाजूंनी परस्परांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला.

सीमेवर असणारा तणाव पाहता या बैठकांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. कालच्या बैठकीत  लष्करी आणि राजनैतिक मार्गांनी दोन्ही देशांमधला संवाद आणि संपर्क सुरूच ठेवण्याबाबत,तसेच लवकरात लवकर,सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी एक सर्वमान्य तोडगा काढण्याबाबत,उभय बाजूने सहमती व्यक्त करण्यात आली.

दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ज्या ज्या मुद्यांवर सहमती झाली आहे,अशा सर्व निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त केली. मतभेदांचे रुपांतर वादात होऊ न देण्यासाठी आणि सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!