मुंबई :आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा, अन्यथा राज्य शासनात परत जावं, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.
महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना आयुक्त इकबालसिंह चहल यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेत नगरसेवकांशी बोलायची पद्धत नसेल तर त्यांनी महापालिकेतून जिथून आले तिथे परत जावं असं शिवसेनेने म्हटलं आहे.
मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुकीस स्वत: कर्मचारीच गैरहजर राहिल्याचे आज पाहायला मिळाले. दरम्यान, प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस अधिकारी गैरहजर असल्याने महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या. या वेळी आयुक्त इकबाल चहल आणि महापौर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, प्रशासकिय अधिकारी उपस्थित का नाही याचा जाब विचारला असता आयुक्त इकबालसिंग चहल यांनी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना उद्धटपणे उत्तरं दिली. प्रभाग समिती निवडणुकीत प्रशासकिय अधिकारी वेळेवर उपस्थित राहिले नसल्यानं सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनात वाद निर्माण झाला.
महत्वाच्या बातम्या-
- भारत आणि चीन सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा देण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
- महाराष्ट्रासह वीस राज्यांना खुल्या बाजारातून 68,825 कोटी रुपये कर्ज घेण्याची परवानगी


