Share

श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने सलग ३रा मालिका विजय मिळवला आहे. याआधी भारताने न्युझीलँडला आणि वेस्ट इंडिजला टी २० यामध्ये परास्त केले होते. आता भारतीय संघाने श्रीलंकेलाही पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दौऱ्यात संपूर्ण भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितने संघातील खेळाडूंना एक विशेष संदेश दिला आहे.

रोहितने (rohit sharma) सामना संपल्यानंतर सांगितले “आम्ही काही वेळा माघार घेतल्याचे आम्हाला समजते आहे , परंतु मुलांना (भारतीय संघातील खेळाडू) सांगणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला संघातील तुमच्या स्थानाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आपल्या संघात जी काही पोकळी आहे ती आपण भरून काढू. आपल्याला फक्त पुढे जायचे आहे.” रोहितने या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यात काही खेळाडू खराब परफॉर्मन्सचा सामना करत असताना रोहितने हा संदेश देत त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

यावेळी रोहितने इतके सगळे चांगले खेळाडू असताना प्लेयिंग इलेव्हन तयार करणे अवघड असल्याचे देखील सांगितले आहे. “हे एक मोठे आव्हान असणार आहे, पण फॉर्ममध्ये नसल्यापेक्षा फॉर्ममध्ये असलेले लोक असणे छान आहे. आम्ही एकत्र खेळलो आणि आम्ही खूप चांगले खेळलो. या मालिकेतून खूप सकारात्मक गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली आहे कि चांगली कामगिरी करणाऱ्या काही लोकांना संधी देणे गरजेचे आहे. जर या मुलांपैकी काही मुलांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला, तर तुम्ही ताकदीसह पुढे जाऊ शकता.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!