🕒 1 min read
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने सलग ३रा मालिका विजय मिळवला आहे. याआधी भारताने न्युझीलँडला आणि वेस्ट इंडिजला टी २० यामध्ये परास्त केले होते. आता भारतीय संघाने श्रीलंकेलाही पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दौऱ्यात संपूर्ण भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितने संघातील खेळाडूंना एक विशेष संदेश दिला आहे.
रोहितने (rohit sharma) सामना संपल्यानंतर सांगितले “आम्ही काही वेळा माघार घेतल्याचे आम्हाला समजते आहे , परंतु मुलांना (भारतीय संघातील खेळाडू) सांगणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला संघातील तुमच्या स्थानाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आपल्या संघात जी काही पोकळी आहे ती आपण भरून काढू. आपल्याला फक्त पुढे जायचे आहे.” रोहितने या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यात काही खेळाडू खराब परफॉर्मन्सचा सामना करत असताना रोहितने हा संदेश देत त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
यावेळी रोहितने इतके सगळे चांगले खेळाडू असताना प्लेयिंग इलेव्हन तयार करणे अवघड असल्याचे देखील सांगितले आहे. “हे एक मोठे आव्हान असणार आहे, पण फॉर्ममध्ये नसल्यापेक्षा फॉर्ममध्ये असलेले लोक असणे छान आहे. आम्ही एकत्र खेळलो आणि आम्ही खूप चांगले खेळलो. या मालिकेतून खूप सकारात्मक गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली आहे कि चांगली कामगिरी करणाऱ्या काही लोकांना संधी देणे गरजेचे आहे. जर या मुलांपैकी काही मुलांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला, तर तुम्ही ताकदीसह पुढे जाऊ शकता.”
महत्वाच्या बातम्या
- “…पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
- झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार
- IND vs SL : रोहित शर्माने जिंकलेली ट्रॉफी ज्याच्या हाती दिली ; जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- IND vs SL : कर्णधार रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड , धोनी आणि कोहलीसुद्धा असा पराक्रम करू शकले नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
