🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेवरील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 मध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma )ट्रॉफी गोळा करण्यासाठी गेला. त्यानंतर लगेचच, त्यांनी ते एका अनोळखी माणसाच्या हाती दिली. बरीच वेळा चाहत्यांमध्ये हा व्यक्ती आहे तरी कोण याची चर्चा होती. आता तो अनोळखी माणूस बीसीसीआयचे प्रतिनिधी जयदेव शाह (jaydev shah) असल्याचे समजले आहे.
जयदेव हा सौराष्ट्रचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी सचिव आणि क्रिकेटपटू निरंजन शाह यांचा मुलगा आहे. त्याने १२० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि २९. ९१ च्या सरासरीने ५३५४ धावा केल्या आहेत. जयदेव सध्या SCA चे (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे) अध्यक्ष आहेत. “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे अध्यक्ष (सौरव गांगुली) आणि सचिव (जय शाह) यांचे आभार मानतो,” असे त्यांने सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थितीबद्दल सांगितले होते.
https://twitter.com/addicric/status/1497992149677137925?s=20&t=EEKJ7O4-Ok-gc6oTNlix-A
भारतीय संघाने १४८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यरने दमदार खेळी केली आणि ६ गडी राखत सामना जिंकला. भारताने केवळ तीन सामन्यांची मालिका ३-० अशीच जिंकली नाही तर T20I क्रिकेटमधील त्यांनी विजयाची घोडदौड सुरु ठेवली आहे. भारतासाठी हा ११ वा विजय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- IND vs SL : कर्णधार रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड , धोनी आणि कोहलीसुद्धा असा पराक्रम करू शकले नाही
- “समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार”, रामदास आठवलेंनी दिला नारा
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
- IND vs SL : भारतीय संघाच्या विजयासाठी श्रेयाने मोठा गेम केला यार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
