चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील हा या हंगामातील दुसरा पराभव होता. या पराभवानंतर कर्णधार रोहितला आणखी एक धक्का बसला आहे. सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून रोहितला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित तिसऱ्या षटकापासुन मैदानावर नव्हता. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे केरॉन पोलार्डने केले होते. त्यामुळे खरी चुक ही पोलार्डची होती. मात्र भुर्दंड रोहित शर्माला बसला.
जर ही चुक दुसऱ्यांदा घडली तर दंडाची रक्कम दुप्पट म्हणजे २४ लाख रुपये भरावी लागेल. जर तिसऱ्यांदा असी चूक झाल्यास कर्णधाराला तब्बल ३० लाख रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. याबरोबरच त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात येईल. नियमानुसार प्रत्येक संघाने आपली २० षटके ९० मिनिटांत पूर्ण करणे गरजेचे आहे. यापूर्वी २० वे षटक हे ९० व्या मिनिटाला सुरु करावे असा नियम होता, परंतु आता दीड तासाच्या आत निर्धारित २० षटके पूर्ण करावी लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पराभवानंतर गुणतालीकेत स्थान न गमावता मुंबई इंडियन्सला बसला ‘असाही’ फटका
- मुंबई इंडियन्सला पुन्हा भोवले फलंदाजाचे अपयश; दिल्लीपुढे ठेवले माफक आव्हान
- सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित मैदानात नसल्याचे खरे कारण आले समोर
- कॅपीटल्स पडले पलटनवर भारी; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखुन विजय
- परभणीच्या महसूल विभागातील सर्व सुनावण्या बंद राहणार : जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
