चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यापुर्वी झालेल्या सामन्यातही मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नव्हती. सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईची फलंदाजी ढेपाळल्याने मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात १३७ धावांची मजल मारली होती. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईचे फलंदाज चांगली सुरुवात करुनही त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकले नाही. कृणाल आणि हार्दिक हे दोन्ही पांड्या बंधु फलंदाजीत अपयशी ठरत आहे.
तसेच मुंबईचे इतर फलंदाजाच्या कामगीरीत सातत्य नाही. काही खेळाडू खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतात त्यामुळेही संघाची धावगतीला लगाम बसत आहे. आता पर्यंतच्या सामन्यात सलामी जोडी पुर्णपणे अपयशी ठरली आहे. पॉवरप्लेचा हवा तसा लाभ मुंबईच्या खेळाडूना घेता आला नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित मैदानात नसल्याचे खरे कारण आले समोर
- कॅपीटल्स पडले पलटनवर भारी; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखुन विजय
- परभणीच्या महसूल विभागातील सर्व सुनावण्या बंद राहणार : जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
- कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी अस्थिव्यंग तज्ज्ञ देणार सेवा
- औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्ये वाढतोय कोरोनाचा कहर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
