🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा वक्तव्य केला आहे. रोहित पवार नेहमीच युवकांची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात. तसेच त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणातील युवा नेतृत्व म्हणूनही पाहिले जाते. दरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा वक्तव्य केला आहे. २०२४ नंतर राजकारणाची समीकरणं बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत. अशा प्रकारचं विधान रोहित पवार यांनी केल आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय कुजबूज सुरू झाली आहे.
जुन्नर येथील एका आयोजित सभेत रोहित पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, “२०२४ नंतरची वेळ ही युवकांची असणार आहे. २०२४ ला आपल्याला एकमेकांसोबत राहून आपल्या हिताचे आणि आपल्या विचाराचे सरकार कसे येईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे जेव्हा युवकांची वेळ येईल तेव्हा निर्णयही युवकांनीच घेतले पाहिजेत. त्या निर्णयांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण कोणते काम कसे करायचे? आणि कोणतं पद कोणाकडे द्यायचं? हे निर्णय युवा पिढीच घेईल.” अशा प्रकारचे विधान रोहित पवार यांनी कले आहे.
“मी असेही म्हणत नाही की सर्वच कामे आम्ही करू, मात्र नवीन पिढी आणि युवक ते त्यांचे निर्णय घेतील. मी भविष्यातील वाटचालीचा तसेच पुढील काळाचाही बराच विचार करून राजकारणात आलो आहे. असे नाही की मी पदाचा विचार नाही करत, मात्र महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या भल्याचं काम करायचं आहे.” असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Ahir : उध्दव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडली – सचिन अहिर
- Sanjay raut | पोटातील मळमळ ओठावर आली, चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरचं पाणी दाखवलं – संजय राऊत
- Deepali Sayed : “मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आणि अमित म्हणजे…”; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल
- National Awards 2022 | राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ नाही; वाचा विवेक अग्निहोत्री काय म्हणाले
- Shivsena : चंद्रकांत पाटील किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत, तेही पाहूयात; शिवसेनेने उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
