मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस वादळी ठरले. काल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यापासून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आज तर विधीमंडळाच्या आवारात भाजपने अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं. यावर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितले.
यानंतर देखील भाजपने आपलं बाहेरील कामकाज चालूच ठेवले. यासह भाजप नेत्यांनी महाविकास आघडी सरकारवर हल्लाबोल केला होता. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. ‘आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील,’ असं भाष्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
‘मी पुन्हा येईन’साठी
किती रडीचा डाव खेळणार?
सभागृहात न जाता बाहेर शो बाजी
करुन काय मिळविणार?#MansoonSession— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 6, 2021
आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करुन काय मिळविणार?,’ असा सवाल करत रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- ‘…अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’; बावनकुळेंचा इशारा
- …अन् उद्धव ठाकरेंसमोरच अजित पवार म्हणाले, ‘शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही’
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य


