🕒 1 min read
नवी दिल्ली : युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय हजारे करंडक स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गायकवाडने या स्पर्धेत त्याने खूप धावा केल्या असल्या तरी त्याचा संघ बाद झाला आहे.
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने चार जबरदस्त शतके झळकावली आणि आपल्या संघासाठी जबरदस्त खेळी खेळली. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र आपल्या गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्राने पाच पैकी चार सामने जिंकले पण साखळी फेरीतून ते बाहेर पडले.
मी फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे – ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड यांच्या मते ते केवळ त्यांच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहेत. एका वृत्तसंशेसी संवाद साधताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘माझ्या यशाचे कोणतेही रहस्य नाही. मी फक्त माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जास्त विचार करत नाही. मात्र, आमच्या संघाने प्रगती केली असती, तर मला माझ्या कामगिरीचा अधिक आनंद झाला असता. व्यक्तिशः ही एक मोठी उपलब्धी आहे आणि मला माझा आणि माझ्या संघाचा अभिमान आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडची बॅट जबरदस्त बोलली. त्याने महाराष्ट्रासाठी सलग तीन आणि एकूण चार शतके झळकावली. गायकवाडने मध्य प्रदेशविरुद्ध 136, छत्तीसगडविरुद्ध नाबाद 154, केरळविरुद्ध 124 आणि चौथ्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
- …आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले- जितेंद्र आव्हाड
- जैसी करनी वैसी भरनी! कोहलीच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना झाली अनिल कुंबळेची आठवण
- कोहलीच्या गौप्यस्फोटानंतर सलमान बट्टने साधला सौरव गांगुलीवर निशाण
- ‘खंडणी सरकार कोणाला पाठीशी घालण्यासाठी न्यायालयात सारखे तोंडघशी पडत आहे?’
- ‘चिअर गर्ल्स संस्कृती आणणारे दुसरं काय करणार?’, नीलेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
