🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बरेच खुलासे केले. प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना साधताना कोहली म्हणाला की, कसोटी संघ निवडीच्या आधी त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) संवाद साधला नव्हता. त्याचवेळी, याआधी वनडेचे कर्णधारपद बदलल्यानंतर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) या मुद्द्यावर विराट कोहलीशी बोलणे झाल्याचे निवेदन जारी केले होते. कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही काढण्यात आले. निवड समितीने मर्यादित षटकांमध्ये एकच कर्णधार असावा असा निर्णय घेतला. आता विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या विधानांमध्ये मतभेद झाल्यानंतर चाहत्यांना सोशल मीडियावर अनिक कुंबळेची (Anil Kumble) आठवण झाली आहे.
विराट कोहली म्हणाला, ‘कसोटीसाठी निवड होण्याच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी माझ्याशी कसोटी संघाबाबत चर्चा केली. कॉल संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले की पाच निवडकर्त्यांनी मी यापुढे एकदिवसीय कर्णधार राहणार नाही असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी याबाबत कोणताही संवाद साधला गेला नव्हता.
तो पुढे म्हणाला, जेव्हा मी बीसीसीआयला सांगितले की मला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडायचे आहे, तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. तसेच मला सांगण्यात आले की हे एक प्रगतीशील पाऊल आहे. मी त्यावेळी माहिती दिली होती की, मला एकदिवसीय आणि कसोटीमध्ये नेतृत्व करायला आवडेल. माझ्या बाजूने संभाषण स्पष्ट होते, परंतु मी हे देखील निदर्शनास आणले की पदाधिकारी आणि निवडकर्त्यांना मी इतर फॉरमॅटमध्ये नेतृत्व करावे असे वाटत नसेल तर ते ठीक आहे.’
विराट कोहलीचे म्हणणे आहे की, टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर या मुद्द्यावर बीसीसीआयशी बोलले नाही. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नका, अशी विनंती त्याला कधीही करण्यात आली नाही. आता विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना सोशल मीडियावर अनिल कुंबळेची आठवण येत आहे. अनिल कुंबळे आणि विराट कोहलीबद्दल युजर्स जोरदार ट्विट करत आहेत.
माजी कर्णधार आणि महान लेगस्पिनर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यात गंभीर मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या अहवालानंतर अनिल कुंबळे यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा 2017 मध्ये राजीनामा दिला. चार वर्षांपूर्वी अनिल कुंबळेची हकालपट्टी झाल्यानंतर लगेचच, विराट कोहलीने बीसीसीआयला तत्कालीन माजी कॅग विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून बदली करण्याची विनंती केली होती.
असे मानले जाते की BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना अनिल कुंबळे BCCI च्या क्रिकेट सुधार समिती (CIC) चे सदस्य असताना विराट कोहलीने 2017 मध्ये विरोध करूनही मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहावे अशी त्यांची इच्छा होती.
जून 2016 मध्ये कुंबळेची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारत 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, ज्यामध्ये त्यांचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड करूनही कुंबळेने पदाचा राजीनामा दिला. यासोबतच कुंबळेने कर्णधार विराट कोहलीला प्रशिक्षक म्हणून नको असल्याचेही सूचित केले होते.




महत्वाच्या बातम्या
- तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू
- १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार
- ‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका’
- आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळांची प्रतिक्रिया‘
- हा इतिहास संसदेत पाजळण्यापेक्षा मुंडे, राठोडांना सांगितला असता तर बरं झालं असते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
