Share

पंतप्रधानांचे ट्विट रिट्विट करणे विराटला पडले महागात; चाहत्यांनी केलं ट्रोल

Published On: 

मुंबई : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात घेतली आहे.

‘या महिन्यात क्रिकेटच्या पीचवरून चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट टीमने सुरुवातीच्या अडचणींवर मात करत शानदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली. खेळाडूंची कठोर मेहनत आणि त्यांचं टीम वर्क प्रेरणा देणारं आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात हा विजय प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. मात्र, मोदी यांच्या या प्रशंसेनंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले होते. मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केल्या गेलेल्या ट्वीट मध्ये लिहिले होते, “या महिन्यात क्रिकेटच्या खेळपट्टीवरून खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणींनंतर शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. खेळाडूंची मेहनत आणि संघकार्य प्रेरणादायक आहे.”

पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्वीटला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने रिट्विट करत भारतीय ध्वजाची इमोजी पोस्ट केली. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, “अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा विजय मिळवला गेला आहे. तू त्याचे श्रेय घेऊ नकोस.” अन्य एका चाहत्याने लिहिले की, “तू स्वतः या प्रवाहापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!