Share

बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली

Published On: 

बडोदा : कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरु झालेल्या. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली आहे. बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत तमिळनाडूने हे विजेतेपद मिळवले. तमिळनाडू संघाने हा सामना जिंकून दोनदा ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याचा डाव १२० धावांवर आटोपला. तमिळनाडूचा युवा फिरकीपटू एम सिद्धार्थने आपल्या चार षटकांत २० धावा देऊन चार महत्वपूर्ण बळी मिळवले. बडोद्यासाठी विष्णू सोलंकीने सर्वाधिक ४९ धावा केल्या. ३६ धावांवर सहा गडी बाद झाल्यानंतर सोलंकी व अतीत सेठ यांनी सातव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत, बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

तमिळनाडूचे हे दुसरे सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी २००६-२००७ चा हंगामा तमिळनाडूमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील दिनेश कार्तिक संघाचा कर्णधार होता. मागील वर्षी अंतिम फेरीत कर्नाटककडून पराभूत झाल्याने तमिळनाडू विजेतेपद पटकावून शकला नव्हता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!