औरंगाबाद : पैठण आपेगाव प्राधिकरण योजने अंतर्गत शहरात सुरु असलेल्या भुमीगत गटार योजनेच्या अंतिम टप्यातील कामाला पुन्हा सुरवात करण्यात आली असुन लवकरच हे काम पुर्णत्वाकडे जाणार असल्याचे मत उपअभियंता उमल चांदेकर व कंत्राटदार विनायक महाजन यांनी व्यक्त केले आहे.
अनेक समस्यांमुळे शहरातील भुमीगत गटार योजनेचे काम रखडले होते, शेवटी या योजनेचे काम अंतिम टप्यात जात असतांना मौलाना साहेब दर्गाजवळ खोदकामावर परीसरातील लोकांनी हरकत घेतल्याने पुन्हा काम बंद पडले होते.
यावेळी या कामावर स्वतः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लक्ष देऊन प्रकरण निकाली काढण्याचे आदेश तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना दिले होते. तहसिलदार शेळके यांनी एमजेपीचे आधिकारी आणि इतर सर्वांसोबत बैठक घेऊन यशस्वी तोडगा काढला. त्यानुसार या योजनेच्या अंतिम चरणातील कामाला सुरवात झाली. कामाला सुरवात करतांना आज मौलाना दर्गा परीसरात एमजेपीचे उपअभियंता उमल चांदेकर, ठेकेदार विनायक महाजन, शाखा अभियंता एस. एस. सरोदे, अभियंता आहेमद शेख, साईड ईन्चार्ज सिध्दार्थ रोडगे आदींची उपस्थीती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया


