उस्मानाबाद : मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत असून मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त ते उस्मानाबादमध्ये आले होत. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, ‘कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना ठप्प होती. या ठप्प योजनेला आम्ही मान्यता दिली. या योजनेमुळे वाशी, उस्मानाबाद, कळंब आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी मिळेल. तसेच २०२४ च्या आधी भूम परांड्याला पाणी येईल. मागच्या भागात वळण बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल.’
मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे काही प्रमाणात पाणी, वैनगंगेपासून नळ गंगेपर्यंत जाणाऱ्या प्रकल्पातून काही पाणी आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातून वळण बंधारे बांधल्याने त्यातून मिळणारे काही पाणी देण्याचे काम आमचे सरकार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्यात अतिरीक्त पाणी देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहितीही जयंत पाटील दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शासकीय कॉलेजच्या फी मध्ये ‘इतक्या’ हजारांची सूट !
- मानलं ‘टाटा’ ! जमशेदजी टाटा जगातील सर्वात दानशूर व्यक्ती
- ओबीसी समाजाला फसवणाऱ्या वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; चित्रा वाघ यांची मागणी
- ‘पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प?’
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

