Share

मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात सध्या साथ रोग विशेष: मलेरिया, डेंग्यू, काविळचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहे. मनपाने अशा रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दवाखाने व रुग्णालयांना दिले आहेत. परंतु मनपाच्या या आदेशाला डॉक्टरांसह रुग्णालयांकडून खो दिला जात असल्याचे निदर्शनाला आले. यामुळे मनपा अशा रुग्णालयांना आता पुन्हा स्मरण पत्र देणार आहे.

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरताच साथीचे आजार फोफावत आहे. यात मलेरिया, डेंग्यू, काविळ आदींचा समावेश आहे. परंतु या रुग्णांची साधी कोरोना चाचणी देखील झालेली नाही. कोणत्याही दवाखान्यात व रुग्णालयात साध्या तापेचा रुग्ण आल्यास विंâवा दाखल झाल्यास त्याची तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी असे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील ९९६ रुग्णालये व दवाखान्यांना दिले आहे.

पत्र देवूनही आठ दिवस उलटले तरी एकही डॉक्टराने रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला नाही. दोन ते तीन दिवस ताप सारखी येत असल्यामुळे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी गेला तर डॉक्टरांकडून डेंग्यू, काविळची चाचणी करून घेण्याचे सांगितले जाते. त्यानंतर पॅथॉलॉजीच्या चाचणी अहवालावरून उपचार केले जातात. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे कळत नाही. यामुळे संबंधित रुग्णालयांना पुन्हा एकदा पत्र देऊन याची आठवण करून दिली जाणार आहे. असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!