नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जलविहार आणि धरण पाहण्यात इतके रमले की ते बैठकीला जाण्याचे विसरले होते. त्यांनी दिवसभरात दोनदा बोट क्लबवर धरणात भ्रमंती केली. नाशिक येथील विभागीय आढावा बैठकीचे नियोजन होते. मात्र आदित्य ठाकरे यांना विसर पडल्याने ही बैठक स्थगित करावी लागली होती. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘जलविहार, आराम, टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच’, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
जलविहार, आराम, टाईमपास…
काम करायला केंद्र सरकार आहेच pic.twitter.com/PNgt2WhMb2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 29, 2022
शुक्रवारी औरंगाबाद दौरा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. नियोजित दौऱ्यानुसार त्यांनी नाशिक महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दोन उड्डानपुलांची पाहणी केली. या उड्डान पुलासाठी वृक्षांची कत्तल होत असल्याने त्याला विरोध होत आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचनाही केल्या. त्यानंतर ते गंगापुर धरणाची पाहणी करण्यासाठी गेले.
या धरणात जलविहार करताना धरणाचे सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंना दिवसभरात दोन वेळा जलविहार करण्याचा मोह झाला. ते जलविहारात रमल्याचे पाहूण अधिकाऱ्यांनीही त्यांना बैठकीची आठवण करुन दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
“काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने भाजपला झोंबल्या मिरच्या- संजय राऊत
‘महाराष्ट्राला ‘बेवडाराष्ट्र’ बनवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न’; किरीट सोमय्या यांची टीका
भाजप आणि माझं नातं वयाच्या नवव्या महिन्यापासून – पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

