🕒 1 min read
नागपूर : कोरोना काळानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी(नाणार)’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. ‘राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंनी कोकणातील या रिफायनरीला समर्थन दिल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.
मात्र, आता ही रिफायनरी विदर्भात केली जावी अशी मागणी करत काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
”3 लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील 40 ते 45 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व 1 लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे पुन्हा एकदा करत आहे आणि म्हणूनच हे स्मरणपत्र आपल्याला पाठवत आहे,’ असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.
तर, ‘रत्नागिरीच्या नाणार येथील 3 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात हलवा, अशा मागणीचे निवेदन मी आपण मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी (दि. 29 नोव्हेंबर 2019 ला) भेटून आपल्याला दिले होते. त्याआधी अशा आशयाचे एक निवेदन मी आधी आपल्याला 8 मार्च 2018 ला दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2018 ला आपण माझ्या मागणीनुसार हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती दर्शविली होती. आपल्या व्यक्तिगत भेटीत आणि जाहीर सभेतसुद्धा आपण हा प्रकल्प विदर्भात नक्कीच स्थलांतरित करू, असे आश्वासन वारंवार दिले होते, हे विशेष.’
नाणार प्रकल्प हा विदर्भात यावा यासाठी समर्थन करणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आता हा रखडलेला प्रश्न मार्गावर आणावा ही विनंती.#विदर्भ #nanar #नाणार #refinary #CMOMaharashtra #UddhavThackeray @cmomaharashtra_ pic.twitter.com/WOkLsBZiXh
— Dr. Ashishrao R. Deshmukh Office (@AshishRDoffice) March 7, 2021
‘रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विदर्भातील मागास जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगधंदे येण्यास व विदर्भाचा विकास होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल तसेच कृषी आधारित प्रकल्पांना नव्या संधी उपलब्ध होऊन जे शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे जीवन संपवतात ते देखील थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल. लगतच्या 5 राज्यांना या प्रकल्पामुळे फायदा होईल,’ असं सविस्तर भाष्य करत आशिष देशमुख यांनी हा रखडलेला प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याआधीच विदर्भात हलवावा अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला,पोलिसांत तक्रार दाखल
- चित्रा वाघ यांचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी यवतमाळमधून एकाला अटक
- रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय
- शिवसेना स्वबळावर लढवणार गोव्यात २५ जागा : संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

