Share

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनंतर इम्रान सरकारमधील मंत्र्याची प्रतिक्रिया ‘आम्हालाही शांतता हवी’

Published On: 

नवी दिल्ली : मंगळवारी 23 मार्चला भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन होता यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून भारत पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण असतात मात्र तरी देखील भारताकडून अनेकदा पाकिस्तानला मैत्रीचा हात दिला जातो तर मदत देखील केली जाते.

दरम्यान आता पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनंतर इम्रान सरकारमधील मंत्र्याची त्यावर प्रतिक्रिया आली असून इम्रान सरकारमध्ये मंत्री असलेल्या असद उमर यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या या पाऊलाचं स्वागत केलं आहे. असद उमर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे पाठवण्यात आलेला 23 मार्चचा संदेश हे एक चांगलं पाऊल आहे. पंतप्रधान झाल्यापासूनच इम्रान खान शांतीच्या मार्गाला पाठिंबा देण्याचा आणि सर्व शेजाऱ्यांसोबत शांती कायम ठेवण्याचं आवाहन करत आहेत.

मागील काही दिवसांपासून पाकिस्ताननं भारताबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत, ज्यातून ते भारतासोबत शांततेचा संकेत देत आहेत. नुकतंच पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर बाजवा यांनी म्हटलं, की पाकिस्तान भारतासोबत जुन्या गोष्टी विसरुन चांगलं नातं बनवू इच्छित आहे. पंतप्रधानांबद्दल बोलायचं झाल्यास इमरान खान यांना 20 मार्चला कोरोनाची लागण झाली तेव्हा मोदींनी ट्वीट करत ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!