Share

‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी करताना अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकादरम्यान कोहलीने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका होताना दिसत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं संघ निवडीच्या निर्णायवरून विराटवर गंभीर आरोप केले. संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा आरोपही सेहवागनं केला. सातत्यानं अपयशी ठरूनही लोकेश राहुल याला संधी मिळते, तर दुसरीकडे युझवेंद्र चहलला १-२ सामन्यांतील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसवले जाते, यावरून वीरू चांगलाच भडकला.

क्रिकबजशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गोलंदाजाला एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केले जाते, तेच फलंदाज लोकेश राहुलला चारवेळा संधी दिली जाते. गोलंदाजांनाही काही सामन्यातील खराब कामगिरीनंतरही संधी मिळायला हवी. युझवेंद्रच्या जागी जसप्रीत बुमराह असता आणि चार सामन्यांत त्याला चांगली कामगिरी करता आली नसती, तर त्याला संघाबाहेर केलं असतं का?, अजिबात नाही. तेव्हा तुम्ही म्हणाला असता की तो चांगला गोलंदाज आहे आणि तो पुनरागमन करेल.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!