🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास (Ramdas Athavale) आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले, “हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर हे पहायला पाहिजे. हे भांडण मात्र मिटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यात पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी. अपशब्द वापरण्यापेक्षा किंवा शिवराळ भाषा वापरण्यापेक्षा महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपली पाहिजे.”
तसेच दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे पुढील निवडणुकीत मोठं नुकसान होणार आहे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि बीजेपीही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल. पण सध्या तरी शिवसेनेचं तसं काही चित्र दिसत नाहीये. असा दावाही आठवले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजप भारतीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”, सचिन सावंतांनी केला व्हिडिओ पोस्ट
- “आम्ही साहाला पत्रकाराचे नाव विचारून कारवाई करू”; बीसीसीआय अधिकाऱ्याचे वक्तव्य
- “…यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका”, भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- रात्री १२ वाजता भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- निवृत्ती घेण्याआधी धोनी चहरला भेटला होता; आणि सांगितली हि मोठी गोष्ट!


