Share

“आरसीबीने माझे…” ; विराट कोहलीचे भावनिक वक्तव्य

Published On: 

मुंबई : विराट कोहलीने ९ वर्ष आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले आहे. २००८ मध्ये आरसीबीने विराटला खरेदी केले होते तेव्हापासून विराट आजलगत विराट आरसीबीचा भाग आहे. तेव्हा विराट अंडर १९ संघात खेळत होता. त्याच्या आरसीबीसोबतच्या १५ वर्षाच्या अनुभवाबाबत विराटने आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दानिश सेठसोबत आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला ” आरसीबीने मला जेव्हा खरेदी केलंतो माझ्या आयुष्यातला इतका प्रभावशाली क्षण होता की मला त्या वेळी ते जाणवलं नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवत कि, तेव्हा आताच्यापेक्षा परिस्तिथी खूप वेगळी होती.” त्यावेळी दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ सुद्धा विराटला खरेदी करण्यास उत्सुक होता. त्याबाबतही विराटने यावेळी सांगितले. ” दिल्लीचा संघ मला खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे मी ऐकले होते. मात्र त्यांना गोलंदाज हवा होता त्यामुळे त्यांनी माझ्या ऐवजी प्रदीप सांगवानला खरेदी केले.”

आयपीएलच्या पहिल्या ऑक्शन आधीच विराटने अंडर १९ संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. निवड झाली तेव्हा विराट संघासोबत मलेशियात होता याबाबतही त्याने सांगितले आहे. “आम्ही सर्वजण अंडर-१९ वर्ल्डकपसाठी मलेशियामध्ये होतो. मला तो दिवस चांगला आठवतो जेव्हा ड्राफ्ट होत होते. अंडर-१९ डायनॅमिक तेव्हा थोडा वेगळा होता. तुम्ही भारतासाठी खेळला नसाल तर तुम्हाला किती रकमेत निवडले जाऊ शकते यावर तेव्हा निर्बंध होते. मला आठवते की आमच्यासाठी तो क्षण खूप आश्चर्यकारक होता. कारण ज्या रकमेत त्यांनी मला निवडले होते ते ऐकून मी वेडा झालो होतो.” विराटला आरसीबीने १२ लाख रुपयात खरेदी केले होते. तर या १५व्या हंगामात तो १५ करोड रुपयात रिटेन झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!