🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होत आहे. तसेच प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी देखील या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.
या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना अर्थसंकल्पाचे वर्णन अत्यंत निराशाजनक असे केले. आपण जेवढे भाषण ऐकले त्यात ना मनरेगाचा उल्लेख होता ना संरक्षण क्षेत्रासाठी काही ठोस होते. महागाई वाढत असताना मध्यमवर्गाला प्राप्तिकरात काहीही दिलासा नाही. गती शक्ती व डिजिटल चलनाच्या केवळ घोषणाच आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
I think to present a prudent budget with no major freebies or populist moves 10 days before a major election is very responsible and commendable.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) February 1, 2022
लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) या अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले, या अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलंय. त्याने म्हटलंय की, मला वाटतं की, मोठ्या निवडणुकांच्या १० दिवस अगोदर कोणतेही मोठे मोफत किंवा लोकांना भुरळ पाडतील अशा घोषणा न करता एक विवेकपूर्ण असा अर्थसंकल्प सादर करण्याची ही कृती खूपच जबाबदार आणि प्रशंसनीय आहे, असे मत भगत यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
भारत विरुद्ध वेस्टइंडीज एकदिवसीय मालिका येत्या ६ फेब्रुवारी पासून
-
‘धक्का बुक्की नही करणेका, टपाटप, टपाटप…’; रुपाली पाटलांचा हिंदुस्तानी भाऊवर पुन्हा एकदा निशाणा
-
अभिनेता राजकुमार रावने केला वैवाहिक आयुष्यावर खुलासा, म्हणाला…“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर”
-
‘या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची निराशा’; नाना पटोलेंची प्रतिक्रिया
-
“हा अर्थ संकल्प म्हणजे जुमालेबाजी…”; नवाब मालिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
