मुंबई: यावर्षीचा अर्थसंकल्प दिशाहीन असून त्यातून नोकरदार, आणि सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एकीकडे बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे, पण नोकरीच्या संधी आणि सर्वसामान्याचे दरडोई उत्पन्न घटत आहे. याबाबत सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलेले नाही. त्यात सरकार जुनी स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी लोकांना नवीन स्वप्न दाखवत आहे. पण त्यातही ही नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता ही मार्ग केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. हा एक दिशाहीन अर्थसंकल्प आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ग्रामीण विकास आणि मनरेगासाठीची आर्थिक तरतूद मोदी सरकारने कमी केली आहे. त्यामुळे ग्रामीण विकासात अडथळा निर्माण होणार आहे. मनरेगाची तरतूद कमी केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या योजनांवर परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत रक्कम सोडली तर इतर कोणती ही योजना जाहीर केलेली नाही. करोनामुळे भारताचे शेतीवरील अवलंबन वाढले आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शेतीवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे ही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकार ८० लाख नवीन घरे बांधू इच्छित आहेत. पण सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीचे काय? असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ५ जी सेवा सुरु करून ई शिक्षणाच्या तरतुदी निर्मला सीतारामन यांनी सांगितल्या आहेत. पण ग्रामीण भागात अजून ४ जी सेवाही नीट उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. हे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. फक्त मोबाईल स्वस्त करून चालणार नाही तर इंटरनेट सुद्धा स्वस्त झाले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. केंद्राने सामाजिक क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची निराशा’; नाना पटोलेंची प्रतिक्रिया
“हा अर्थ संकल्प म्हणजे जुमालेबाजी…”; नवाब मालिकांचा हल्लाबोल
‘शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प’; गिरीश महाजन यांचे वक्तव्यं
‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

