बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)कापूस व सोयाबीनचा प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत. सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन १७ नोव्हेंबरपासून सुरू केले होते.
शासनालाने या पिकाला योग्य तो भाव देण्याची रविकांत तुपकरांची मागणी आहे. दरम्यान, सोयाबीन-कापुसच्या मागणी बाबत मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना रविकांत तुपकर यांच्या गाडीला काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तुपकर यांच्या गाडीचेही या अपघातात खूप नुकसान झाले आहे.
२४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला बैठक होत आहे. यासाठी चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली आणि यात हे दोघे तरूण जखमी झाले.
गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत. अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन चिखली येथील डॉ. महिंद्रे रुग्णालयात दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजिंक्य रहाणे नशीबवान आहे की, त्याला आतापर्यंत..’,’या’ खेळाडूंनी साधला रहाणेवर निशाना
- पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केलं – जेपी नड्डा
- …याला तुम्ही काय नाव देणार? सचिनने केला ‘तो’ व्हिडिओ पोस्ट
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- अश्विन गोलंदाजीत मधल्या टप्प्यातील आक्रमक पर्याय- रोहित शर्मा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

