मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
प्रतिमा मलिन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात. हा धुतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या वाटेला जावू नका. त्यातून कुणाचंही भले होणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभागृहात दिला.
पुढे म्हणाले, “सुधीरभाऊ तुम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणलात. आपल्या विदर्भाच्या बाजुला मध्य प्रदेश आहे, त्याची आकडेवारी वाचतो, त्यास मद्य प्रदेश म्हणताल का तुम्ही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विचारला. तुम्ही आमच्यावर टीका करा, पण महाराष्ट्राला बदनाम करणं योग्य नाही. टिका करा, टोकाला जाऊन करा. रावणाचा जीव बेंबीत होता, तसं काहींचा जीव मुंबईत आहे. त्यांना केंद्रात सरकार मिळालं, तरी त्यांचा जीव मुंबईत आहे”, असे म्हणत नाव न घेता अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या –
गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर; ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केले स्वागत
औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेंवर कारवाई कधी? अस्तित्वात नसलेल्या शाळांना मंजूर केलं होतं क्रीडासाहित्य!
‘मिका सिंह’ला हवी आहे कपिल शर्माच्या पत्नीसारखी जीवनसाथी,म्हणाला
“एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलं” – अनिल परब
“जगभरात कोरोनाची चौथी लाट…”, राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

